
म्यानमारच्या चिन राज्यात झालेल्या भीषण लढाईमुळे हवाई हल्ल्यांनंतर गेल्या २४ तासांत मिझोरामच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून जवळपास दोन हजार लोकांनी भारतात प्रवेश केला आहे.
आयझॉल: म्यानमारमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. म्यानमारच्या चीन राज्यात एअर स्ट्राईक (Myanmar Airstrike) करण्यात आली आहे. हवाई हल्ले आणि जोरदार गोळीबारामुळे म्यानमारमधील 2000 हून अधिक लोकांनी मिझोराममध्ये प्रवेश केला आहे. हे सर्व लोक सीमा ओलांडून गेल्या २४ तासांत मिझोराममध्ये दाखल झाले आहेत.
हे सुद्धा वाचा
नेमकं काय घडलं?
म्यानमारच्या चिन राज्यात झालेल्या भीषण लढाईमुळे हवाई हल्ल्यांनंतर गेल्या २४ तासांत मिझोरामच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून जवळपास दोन हजार लोकांनी भारतात प्रवेश केला आहे. मिझोरामच्या चंफई जिल्ह्याचे उपायुक्त (डीसी) जेम्स लालरिंचना यांनी सांगितले की, रविवारी संध्याकाळी म्यानमारमधील सत्ताधारी जंटा आणि मिलिशिया ग्रुप पीपल्स डिफेन्स फोर्स (पीडीएफ) यांच्या समर्थनाखालील सुरक्षा दलांमध्ये जोरदार गोळीबार झाला. चंफई जिल्ह्याची सीमा शेजारील चिन राज्याशी आहे.









