
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर व हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच महाराष्ट्राची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत.महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून महाविकास आघाडीतील जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे.