
mumbai weather news today : महाराष्ट्रासह उत्तर भारतातील राज्यांतून मान्सून माघारी परतला आहे. त्यामुळं राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमधील हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईतील नागरिकांना ऑक्टोबर हिटचा तडाखा बसत आहे. हवामान बदलामुळं सामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु आता मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अरबी समुद्रात तयार झालेलं तेज चक्रिवादळ पुढील काही तासांमध्ये मुंबईच्या किनाऱ्यावर धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.




