
मध्य रेल्वेचा पसारा
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात मध्य रेल्वेच्या सेवाचा पसारा मोठा आहे. मध्य रेल्वेकडून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकापासून ठाणे जिल्ह्यातील कल्याणपर्यंत आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत, खोपोलीपर्यंत वाहतूक सेवा दिली जाते. याशिवाय, या मार्गावरून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांत तसंच देशभरात एक्स्प्रेस गाड्या धावत असतात. आजच्या तांत्रिक बिघाडामुळं या सर्व सेवेवर परिणाम झाला. सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त होऊन वाहतूक सुरळीत झाल्याचं प्रशासनानं सांगितलं असलं तरी सर्व काही सुरळीत होण्यास आणखी बराच वेळ जाईल, असं समजतं.








