
यंदाचा गणेशोत्सव १९ सप्टेंबरपासून सुरु होणार असून अनंत चतुर्दशी २८ सप्टेंबरला आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात मेगाब्लॉक घेण्यात येणार नसल्याच्या निर्णयाने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, मेगा ब्लॉकदरम्यान मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, पालघर, वसई विरार येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, रेल्वेने मंगलप्रभात लोढा यांची विनंती मान्य केल्याने प्रवाशांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.







