
गेल्या वर्षी मान्सूनच्या उशिरा आगमनामुळे नागरी संस्थेला ०१ जुलै १० टक्के पाणीकपात लागू करावी लागली होती. जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तलाव भरण्यात मदत झाली. त्यानंतर ०९ ऑगस्ट रोजी कपात मागे घेण्यात आली”, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली. मुंबई महानगरपालिका दररोज ३ हजार ९०० एमएल पाणी शहराला पुरवते. मोडकसागर, तानसा, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी आणि विहार तलावातून पाणी उपसले जाते.