
मिळालेल्या माहितीनुसार, मयत हा भिंड जिल्ह्यातील लहार गावातील रहिवाशी आहे. घटनेच्या दिवशी तो घरात जेवण बनवत होता.कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवून तो भाजी टाकण्याच्या तयारीत होता. मात्र, तितक्यात त्याच्या खिशातील मोबाईल उकळत्या तेलाच्या कढईत पडला. यामुळे मोबाईलमधील बॅटरीचा स्फोट झाला. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला. त्याला त्वरीत लहार गावातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. नंतर त्याला पुढील उपचारासाठी ग्वाल्हेर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. मयत तरुणाच्या पश्चात पत्नी, एक मुलगी (वय, १४) आणि एक मुलगा (वय, ८) आहे.








