
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण घटनाबाह्य असल्याने निकाली काढला आहे. सरकारने याप्रकरणी सर्वोतोपरी प्रयत्न केले असून शासन निर्णयही काढला आहे. मात्र, मनोज जरांगेंनी एकतर्फी भूमिका घेतली असून त्यांची भूमिका आडमूठेपणाची असून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे, मनोज जरांगेंना पोलिसांनी तात्काळ अटक करावी, अशी मागणी कुणबी सेनेच्यावतीने विश्वनाथ पाटील यांनी केली आहे.







