
मराठा आरक्षण व सगेसोयऱ्यांच्या मागणीवरून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षण द्यायचं आहे, त्यांना सगेसोयऱ्यांच्या मुद्दा मान्य आहे. पण देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना विरोध असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. त्यावर असं काही सिद्ध झाल्यास आपण राजीनामा देऊ आणि राजकारणातून निवृत्त होऊ असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं.त्यानंतर आता मनोज जरांगे यांनीहीआपल्या आरोपांचा पुनरुच्चार करत देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा आरक्षण रोखून धरला असल्याचा दावा केला आहे.