
[ad_1]
जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाज गेल्या ७० वर्षांपासून आरक्षणापासून वंचित आहे.आम्ही कष्ट करतोय आणि आमच्यावर अन्याय केला जातोय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शेवटचं सांगतोय, मराठ्यांना आरक्षण द्या, अन्यथा मराठा समाज काय करू शकतो, याच्या परिणामांना सामोरं जा, असा इशाराही त्यांनी दिला. मराठ्यांना आरक्षण घेणार आणि तेही ओबीसीमधूनच घेणार, त्याला काय करायचं ते कर असा इशारा जरांगे यांनी छगन भुजबळ आणि राज्य सरकारला दिला. जरांगे यांनी भुजबळांचा एकेरी भाषेत उल्लेख केला.
[ad_2]
Source link
