
Manipur Violence : मणिपूरमध्ये गेल्या वर्षी मे महिन्यापासून सुरू झालेला हिंसाचार अद्याप थांबलेला नाही. हा तणाव सध्या कमी होण्याची चिन्हे देखील दिसत नाहीत. बिष्णुपूरमध्ये आज भीषण रॉकेट हल्ल्यानंतर झालेल्या हिंसाचारात व गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, एका व्यक्तीला झोपेत असताना गोळ्या घालून ठार करण्यात आले. तर त्यानंतर झालेल्या गोळीबारात चौघांना ठार करण्यात आले.