
‘या स्पर्धेत भारतीय संघ चांगला खेळला. सर्व सामने जिंकला, पण काही पापी लोकांनी जिथं हजेरी लावली, तो एकमेव सामना भारतीय संघ हरला, असं ममता म्हणाल्या. शेवटचा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. त्यामुळं त्यांचा रोख त्यांच्याकडंच असल्याचं स्पष्ट आहे.








