Maldives-India Clashes | ‘मालदीवमधून लष्कर मागे घ्या’; मालदिव सरकारने भारताला दिली 15 दिवसांची डेडलाईन | Navarashtra (नवराष्ट्र)

0
15
Maldives-India Clashes | ‘मालदीवमधून लष्कर मागे घ्या’; मालदिव सरकारने भारताला दिली 15 दिवसांची डेडलाईन | Navarashtra (नवराष्ट्र)


मालदिव आणि भारत यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. दरम्यान, मालदिवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी रविवारी पुन्हा एकदा ‘इंडिया आउट’चा नारा दिला आहे. मोहम्मद मुइज्जू यांनी भारताने मालदीवमधून आपले सैन्य मागे घ्यावे या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.

माले : मालदिव आणि भारत यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. दरम्यान, मालदिवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी रविवारी पुन्हा एकदा ‘इंडिया आउट’चा नारा दिला आहे. मोहम्मद मुइज्जू यांनी भारताने मालदीवमधून आपले सैन्य मागे घ्यावे या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. यासोबतच त्यांनी भारताला 15 मार्चचा अल्टिमेटम दिला आहे. यापूर्वी मालदिवने दोन महिन्यांपूर्वी भारतीय सैन्य हटवण्याची मागणी केली होती.

सरकारी आकडेवारीनुसार, मालद्वमध्ये 88 भारतीय सैनिक आहेत. नुकत्याच चीनच्या दौऱ्यानंतर मायदेशी परतलेले राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू आता भारताबाबत सातत्याने टोकदार विधाने करत आहेत.






Source link