
Maharashtra Weather Update : राज्यात मॉन्सूनची उत्तरी सीमा ही स्थिर आहे. राज्यात हळू हळू मॉन्सून पुढे सरकत आहे. तर राज्यात आजपासून पुढील काही दिवस हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मुंबई, पुणे, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये उद्यापासून पुढील काही दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाडा व विदर्भात देखील पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुढील पाच दिवस वादळी वारे, मेघ गर्जना, वीजांचा कडकडाट व ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ट्रेंडिंग न्यूज







