
‘,महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील अनेक गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. या चित्रपटाची गाणी जितकी श्रवणीय आहेत, तितकेच या चित्रपटातील संवाद देखील दमदार असल्याचे या ट्रेलरवरून लक्षात आले आहे. ‘सह्याद्रीचा सिंह आहे, पिंजऱ्यात नाही अडकवू शकत आपण…’, ‘आम्ही कलाकार आहोत पण कुणाचे मिंधे नाहीत..’ असे दमदार संवाद या ट्रेलरमध्ये ऐकू येत आहेत. या चित्रपटातून ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘जेजुरीच्या खंडेराया जागराला या या’, ‘आगंगंगं इंचू चावला…’ अशी विविध प्रकारातील शाहिरांनी गायलेली गाणी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अजय-अतुल या संगीतकार जोडीने शाहिरांच्या संगीत कारकिर्दीला पूर्ण न्याय दिला आहे. त्यांची ही विविधांगी गाणी पडद्यावर रसिकांसाठी एक आगळी पर्वणीच ठरणार आहे.







