
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहव अन्य केंद्रीय पातळीवरील नेते महाराष्ट्रात येऊन महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत.याच महायुतीच्या उमेदवारांमध्ये नवाब मलिकही उमेदवार आहेत, ज्यांच्यावर भाजपाने दाऊदशी संबंध असल्याचे आरोप करुन जेलमध्ये टाकले होते. सत्तेसाठी उद्या भाजपा अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला निवडणुकीत उभे करेल तर त्याला काय सत्ता जिहाद म्हणायचे का? असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.