Maharashtra Election : मतदान संपल्यानंतरही ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी? काँग्रेसचा निवडणूक आयोगाला सवाल

0
2
Maharashtra Election : मतदान संपल्यानंतरही ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी? काँग्रेसचा निवडणूक आयोगाला सवाल


विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचंड विजय झाला असून महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यादांच एखाद्या पक्षाला किंवा आघाडीला इतकं बहुमत मिळालं आहे. महाविकास आघाडीला ५० चा आकडाही गाठता आलेला नाही. या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला आहे. त्य़ाचबरोबर मतदान प्रक्रियेवरही शंका उपस्थित केल्या जात आहे. यानंतरआता देशभरात ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे.



Source link