
संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ओवेसींनी आगांनी विधानसभा निवडणूकीसाठी ५ उमेदवारांची घोषणा करत पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. ओवैसी म्हणाले की, गेल्या १० वर्षात भाजपने जे नियम बनवले त्याचे नुकसान मुस्लिम समाजाला सोसावे लागत आहे. तीन तलाक कायद्याने पती तुरुंगात गेला. जेलमध्ये राहून तो पत्नीला कसे पैसे देणार. हा कायदा केवळ मुस्लिमांना त्रास देण्यासाठी आणला. मोदी आणि शहांनी इतकी घाण करून ठेवली आहे की, पाच वर्षापासून मुस्लिम, ख्रिश्चन आणि आदिवासी सडत आहेत. ओवैसी म्हणाले की, सप्टेंबरमध्ये जनगणनेचे काम सुरू होईल. मला भीती वाटते की, यावेळी एनपीए, एनआरसीचे काम सुरू होऊन आपल्याकडे पुरावे मागितले जाणार. तुमचे पूर्वज कुठ जन्मले असे विचारले जाणार.