
Lok Sabha Security Breach : १३ डिसेंबर रोजी संसदेत झालेल्या घुसखोरीवरून विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणावरून संसेदत गदारोळ सुरू आहे. या प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन द्यावे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. गृहमंत्री शहा सभागृहात येऊन संपूर्ण घटनेवर निवेदन करत नाहीत, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. या प्रकरणी अजूनपर्यंत प्रतिक्रिया न दिलेल्या राहूल गांधी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या प्रकरणी बेरोजगारी व महागाई मुख्य कारण असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.








