
२६ जून २०२४ रोजी एकूण ४४ घटनांची नोंद झाली. या घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात भूस्खलनामुळे ८, वीज कोसळून ५आणि पुरामुळे एक जणांचा मृत्यू झाला आहे. भूस्खलनाच्या घटनेत दोन जण अद्याप बेपत्ता आहेत, तर १० जण जखमी झाले आहेत, अशी माहिती एनडीआरएमएचे प्रवक्ते दिजान भट्टराई यांनी दिली.