
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुकीची धामधूम सुरू असतांना एक वाईट घटना पुढे आली आहे. येथील आजरा तालुक्यात ही घटना घडली आहे. हिरण्यकेशी नदीत (Hiranyakeshi River) धुणे धुण्यासाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू झाला आहे. मृत तिघेही एकाच कुटुंबातील होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.





