अलिगढ रेंजचे आयजी शलभ माथुर यांनी या दुर्घटनेला दुजोरा देताना सांगितले की, या दुर्घटनेत आठ मुले आणि सात महिलांसह एकूण २२ जणांचा मृत्यू झाला. समोरून येणाऱ्या कारसोबतचा अपघात टाळण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टरचालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर ट्रॉली चिखलाने भरलेल्या तलावात उलटली. जखमींना कासगंज येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.