
‘जाऊ बाई गावात’ हा एक हटके विषय असलेला कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या कार्यक्रमात काही तरुणी सहभागी झाल्या असून, त्या गावखेड्यातलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्या तरुणी वेगवेगळ्या शहरी भागांतून आलेल्या असून, काही जनी तर अगदी परदेशातून आल्या आहेत. लक्झरी आणि ऐशोआरामाचं आयुष्य जगणाऱ्या या तरुणी आता महाराष्ट्रातील बावधन या गावात येऊन तिथलं जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना अगदी शेण सारवण्यापासून ते दूध काढून, जेवण करण्यापर्यंतची सगळी काम स्वतः करावी लागत आहेत.







