
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगाव येथील काही भाविक हे अक्कलकोट येथे तवेरा गाडीने दर्शनासाठी गेले होते. यावेळी दर्शन घेऊन परत मालेगावकडे प्रवास करत होते. चाळीसगाव येथील कन्नड घाटात मोठ्या प्रमाणात धुके तसेच अंधार होता. यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांची गाडी कन्नड घाटातील दरीत कोसळली. हा अपघात एवढा भीषण होता ही चौघांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले. या जखमींना रुग्णालयात हलवले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.





