
‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं जातं. आनंद, विनोद आणि कुटुंबातील हळवे बंध यातून कथानक अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडलं जातं. या मालिकेत जागतिक महिला दिन देखील अशाच हटके पद्धतीने साजरा केला जाणार आहे. या मालिकेतील शशांक आणि अपूर्वा यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. तर, या मालिकेतील कानिटकर कुटुंब देखील प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग बनले आहे. आता प्रेक्षकांना ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेच्या येत्या भागात आणखी मनोरंजक स्टोरी पाहायला मिळणार आहे.