
वर्ल्डकप ट्रॉफी कोणाकडे जाणार याचा निर्णय रविवारी होणार आहे. ऑस्ट्रेलियाने पाचवेळा विश्वचषक जिंकला आहे, तर टीम इंडियाने दोनदा वर्ल्डकप पटकावला आहे. विश्वचषकाच्या इतिहासात दुसऱ्यांदा भारत आणि ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. गेल्या वेळी २००३ मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे यावेळी कोणाला वर्ल्डकप मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी केलेल्या भविष्यवाणीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.






