माण-खटाव परिसरात अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांनी घ्यावी काळजी!

0
2
माण-खटाव परिसरात अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांनी घ्यावी काळजी!

सातारा :- माण आणि खटाव तालुक्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचा सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून सद्यस्थितीत माण-खटाव परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. अनेक नदी-नाले ओसंडून वाहत असून, काही भागातील पूलही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत.

नागरिकांनी पुढीलप्रमाणे खबरदारी घ्यावी:

  • झाडाखाली आश्रय घेऊ नका, विजा चमकत असताना मोबाईल वापरणे टाळा.
  • पाण्यात असाल तर त्वरित बाहेर पडा.
  • दरड प्रवण क्षेत्र व डोंगर उतारावरील घरांमध्ये न राहता सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा.
  • अत्यावश्यक नसल्यास घराबाहेर पडू नका.
  • नदीकाठच्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी.
  • जुन्या, मोडकळीस आलेल्या घरात राहणे टाळा.
  • पूलावरून पाणी वाहत असल्यास ते ओलांडू नका.
  • पर्यटन स्थळे, धबधबे, दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी जाणे टाळा.
  • अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवा पसरवू नका.
  • झाडांखाली किंवा विद्युत खांबाजवळ थांबू नका.
  • ओढा, नाला वा गटारात पाणी वाहत असेल तर ओलांडण्याचा प्रयत्न करू नका.
  • आपत्कालीन परिस्थितीत खालील नंबरवर तात्काळ संपर्क साधा:
    • दहिवडी विभाग: 9921477433
    • म्हसवड विभाग: 9970970838
    • वडूज विभाग: 8446840071
    • मा. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे जनसंपर्क कार्यालय:
      7058239002 / 9623655569 / 9130293999

नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे व स्वतःच्या सुरक्षेसाठी सतर्क राहावे.
सावध रहा, सुरक्षित राहा!