सातारा :- माण आणि खटाव तालुक्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचा सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून सद्यस्थितीत माण-खटाव परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. अनेक नदी-नाले ओसंडून वाहत असून, काही भागातील पूलही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत.
नागरिकांनी पुढीलप्रमाणे खबरदारी घ्यावी:
- झाडाखाली आश्रय घेऊ नका, विजा चमकत असताना मोबाईल वापरणे टाळा.
- पाण्यात असाल तर त्वरित बाहेर पडा.
- दरड प्रवण क्षेत्र व डोंगर उतारावरील घरांमध्ये न राहता सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा.
- अत्यावश्यक नसल्यास घराबाहेर पडू नका.
- नदीकाठच्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी.
- जुन्या, मोडकळीस आलेल्या घरात राहणे टाळा.
- पूलावरून पाणी वाहत असल्यास ते ओलांडू नका.
- पर्यटन स्थळे, धबधबे, दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी जाणे टाळा.
- अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवा पसरवू नका.
- झाडांखाली किंवा विद्युत खांबाजवळ थांबू नका.
- ओढा, नाला वा गटारात पाणी वाहत असेल तर ओलांडण्याचा प्रयत्न करू नका.
- आपत्कालीन परिस्थितीत खालील नंबरवर तात्काळ संपर्क साधा:
- दहिवडी विभाग: 9921477433
- म्हसवड विभाग: 9970970838
- वडूज विभाग: 8446840071
- मा. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे जनसंपर्क कार्यालय:
7058239002 / 9623655569 / 9130293999
नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे व स्वतःच्या सुरक्षेसाठी सतर्क राहावे.
सावध रहा, सुरक्षित राहा!