
जानकी लढवणार शक्कल
आता सौमित्र कधी लग्न करतोय, याच्ची माहिती ऐश्वर्याला हवी असते. मात्र, जानकी आपल्याला ही गोष्ट सांगणार नाही, हे तिला आधीच माहित होते. त्यामुळे ती जानकीच्या मागावर राहून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. नाना नाही म्हणाले असले, तरी हृषिकेश आणि जानकी आईकडे जाऊन तिला लग्नाला येण्याची मनधरणी करणार आहेत. त्यावेळी ऐश्वर्या दाराला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी जानकी मुद्दाम सौमित्र दोन दिवसांनी लग्न करत असल्याचे सांगणार आहे. ऐश्वर्या ऐकत आहे, हे जानकीला चांगलेच ठावूक होते. मात्र, जानकी लग्नाच्या दिवसाबद्दल खोटं का बोलतेय हे हृषिकेशला कळत नाही. आता जानकीचा हा डाव सफल होणार का? की ऐश्वर्या सौमित्रचं लग्न मोडणार? हे मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळणार आहे.










