
सुमित्राआईने ऐश्वर्याला प्रश्न देखील केला की, ‘मेहंदी खाली पडणार होती, हे तुला आधीच कसं काय कळलं? तू जास्तीची मेहंदी कशी काय आणलीस?’ हे ऐकताच ऐश्वर्याही भांबावली. मेहंदी जानकीच्या चुकीने पडली असली तरी, याची ऐश्वर्याला काहीच कल्पना नव्हती. पुढे जाऊन आपण जानकीची मेहंदी खराब करायची, याच उद्देशाने आधीच तिने जास्तीची मेहंदी मागवली होती. इतकंच नाही, तर या मेहंदीच्या पाकिटावर काहीतरी मेसेज लिहून तो जानकीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ऐश्वर्या करत होती. ऐश्वर्याने सुमित्रा आईला उत्तर देताना असं म्हटलं की, ‘लग्न घर आहे, म्हणजे काही गोष्टी कमी पडू शकतात. ते होऊ नये म्हणून मी आधीच जास्तीची मेहंदी संजना ताईला आणायला सांगितली. जानकी वहिनीची शिकवण आता माझ्यात चांगली चांगली उतरली आहे. त्यामुळेच मी ही हुशारी केली.’