
Maharashtra GBS News: जीबीएस हा आजार रुग्णांच्या जीवावर उठला असून आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. जीबीएस आजारावर नियंत्रण मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली. राज्यातील जीबीएस रुग्णांची संख्या १४० वर पोहोचली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.