
काय होते घनश्याम दरोडेचे आरोप?
घनश्यामने गौतमीवर टीरा करत, “सोलापुरात गौतमीताई पाटलांचा कार्यक्रम चालू असताना खाली तरुण मार खात होते. याला जबाबदार कोण? गौतमीताई, तुमचा लहान भाऊ म्हणून बोलतोय. तुम्ही विचार करा. आज ही दंगल स्टेजच्या खाली होतेय, उद्या ही दंगल स्टेजवर येईल. ही दंगल स्टेजवर आल्यावर तुम्हालाही आवरता येणार नाही. यामध्ये तुम्हीही मार खाऊ शकता. तेव्हा त्याला महाराष्ट्र जबाबदार नसणार, तुमचे कारनामे जबाबदार असणार. तुम्ही महाराष्ट्राचा बिहार करून मोठे होऊ नये. तुम्ही तिच्या अदा बदलाव्यात ” असे म्हटले होते.







