
कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि महाविकास आघाडीची कामगिरी अत्यंत खराब होती. हे सगळ्यांना माहित आहे. महाराष्ट्रातील आमच्या काही नेत्यांची काल बैठक झाली आणि निवडणूक निकालाचे विश्लेषण करण्यात आले. ईव्हीएम हॅक झाल्याची जी माहिती आम्हाला मिळाली ती धक्कादायक आहे. प्रत्येक मतदारसंघात नव्हे, तर निवडक मतदारसंघात व्होटिंग मशीन हॅक करण्यात आले आहे.