
तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दमदार विजयाने काँग्रेसला आश्चर्याचा धक्का बसला आहे. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेते आणि सर्वेक्षणे सांगत होते की, 2024 मध्ये भगवी लाट येण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दमदार विजयाने काँग्रेसला आश्चर्याचा धक्का बसला आहे. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेते आणि सर्वेक्षणे सांगत होते की, 2024 मध्ये भगवी लाट येण्याची शक्यता आहे. परंतु आता काँग्रेसजनही यावर विश्वास ठेवू लागले आहेत, असं मोठं विधान माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी केलं आहे.
चिदंबरम म्हणाले, ‘तीन राज्यांचे निकाल आमच्यासाठी चिंताजनक आणि आश्चर्यकारक आहेत. एवढेच नाही तर त्यांनी भाजपची ताकद आणि त्यांच्या धोरणात्मक कौशल्याचेही कौतुक केले. भाजप प्रत्येक निवडणूक जणू शेवटची लढाई असल्याप्रमाणे लढते. विरोधकांनी हे समजून घ्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी भाजपच्या तीन राज्यांतील विजयाने भाजपला मोठी ताकद दिली आहे. 2024 मध्ये भाजपच्या बाजूने वारे वाहत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.









