
मुंबईच्या आझाद मैदानावरील दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काँग्रेसला आयुष्यात कधी जवळ उभं केलं नाही, त्या लोकांसोबत आज उद्धव ठाकरेंनी युती केलेली आहे. आम्ही हिंदुत्वासाठी सत्ता सोडली होती, आज हे सत्तेसाठी हिंदुत्व सोडून लाचार झालेले आहे. आता हे यांचा पक्ष काँग्रेसमध्ये कधीही विलीन करू शकतात, सत्तेसाठी आम्ही कधीही तडजोड केली नाही आणि भविष्यातही करणार नाही, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांचं शिवतीर्थावर भाषण सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.







