
राजकुमार हिरानीच्या या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त तापसी पन्नू, विकी कौशल, विक्रम कोचर, अनिल ग्रोव्हर आणि बोमन इराणी यांसारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा चार मित्रांची आहे ज्यांना परदेशात जायचे आहे. परंतु, तेथे पोहोचण्यासाठी त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, त्यानंतर ते अवैध मार्ग निवडतात. या चित्रपटाची कथा हृदयाला भिडणारी आहे.








