
कोलकात्याच्या आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटनेनंतर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल सरकारने राज्यभरातील महिलांसाठी नवीन सुरक्षा उपाय योजना सुरू केल्या आहेत. महिला डॉक्टरांसह अन्य महिला कर्मचाऱ्यांनी एकावेळी १२ तासांपेक्षा जास्त ड्युटी करू नये, असे बंधन घातले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने ‘रतीर साथी’ (Rattirer Shaathi) हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.