
‘ओबीसीच्या आरक्षणात आल्याचा आनंद साजरा केला जातोय. आपण जिंकलो असं मराठा समाजाला वाटतंय. मात्र, आधीच्या आरक्षणात ओबीसी १८ ते २० टक्क्यांमध्ये आहेत. त्यात आता आणखी काही लोक येतील. सगळे लोक एकाच ठिकाणी येतील. मराठे ओबीसीमध्ये आल्यामुळं ईडब्लूएसमध्ये मिळणारं जास्तीत जास्त आरक्षण त्यांना मिळणार नाही. ओपनमध्ये जे आरक्षण त्यांना मिळत होतं तेही मिळणार नाही. ओपनमध्ये असताना पूर्ण ५० टक्क्यांमध्ये तुम्हाला संधी होती, तिथं फक्त मराठा व ब्राह्मण समाज होता. ती संधी आता ते गमावून बसलेत. आधी ५० टक्क्यांच्या समुद्रात पोहत होते, आता २० टक्क्यांच्या विहिरीत पोहायला लागेल, असं भुजबळ म्हणाले.






