
‘बिग बॉस मराठी’चा खेळ आता अंतिम टप्प्यावर आला आहे. लवकरच हा खेळ प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यात घरात मिड विक एव्हिक्शन पार पडलं असून महाराष्ट्राची लाडक्या वर्षा ताईंनी या घराचा निरोप घेतला आहे. वर्षा ताई जिंकाव्या अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. पण कुठेतरी त्यांचा खेळ कमी पडला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील कोणाचा प्रवास संपणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे. वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, अंकिता प्रभू – वालावलकर , धनंजय पोवार आणि सूरज चव्हाण यांच्यापैकी एका सदस्याचा प्रवास संपणार होता.