
congress bharat nyay yatra : काँग्रेसने २०२४ च्या निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या यशानंतर आता कॉँग्रेसने दुसऱ्या मोठ्या यात्रेची घोषणा केली आहे. ही यात्रा १४ जानेवारी पासून काढली जाणार आहे. या यात्रेला काँग्रेसने ‘भारत न्याय यात्रा’ असे नाव दिले असून ही यात्रा मणिपूर ते मुंबई अशी ६,२०० किलोमीटरचे अंतर कापत १४ राज्यांतील ८५ जिल्ह्यांतून जाणार आहे.







