
‘एसी नसताना बंदिस्त नाट्यगृहात कशी अवस्था होते, हे कलाकाराच्या नजरेतून देखील पाहायला हवं. प्रचंड प्रकाशात काम करताना उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होते. प्रेक्षकांना तर उकाड्यासोबतच डासांचा त्रासही होतोय. तरीही प्रेक्षक एवढे शांत कसे राहू शकतात?’ असा सवाल करत त्यांनी रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही असे म्हटले आहे. तर, यावेळी त्यांनी प्रेक्षकांची हात जोडून माफी देखील मागितली आहे. केवळ भरत जाधवच नाही तर, अनेक कलाकारांनी नाट्यगृहांच्या अवस्थेवर वेळोवेळी भाष्य केलं आहे. मात्र, प्रशासनाला कधी जाग येणार, असा सवाल सगळेच करत आहेत.








