
महिला दिवाणी न्यायाधीशांनी CJI ला पत्रात म्हण्टलं आहे की,’…माझ्याशी कचर्यासारखी वागणूक होती. जणू मी एक कीटक आहे असे मला वाटले. मला इतरांना न्याय मिळेल अशी आशा होती.
सध्या उत्तर प्रदेशची एक महिला न्यायाधिश चर्चेत आहे. अर्पिता साहू ( Arpita Sahu) बांदा येथे दिवाणी न्यायाधीश असून त्यांनी भारताचे सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्याने शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून जीवन संपवण्याची परवानगी मागितली आहे. या पत्राद्वारे त्यांनी जिल्हा न्यायाधीशांकडे अवास्तव मागण्या केल्याचा आरोप केला आहे. रात्री उशिरा भेटण्यासाठी दबाव निर्माण केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यावेळी त्यांनी कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नही उपस्थित केले आहेत.
हे सुद्धा वाचा
नेमकं प्रकरण काय?
अर्पिता साहू यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. यावेळी त्यांनी बाराबंकी न्यायालयात त्यांच्या नियुक्तीदरम्यान घडलेल्या घटनांबद्दल सांगितले. न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तादरम्यान, दोन पानी पत्रात त्यांनी जिल्हा न्यायाधीशांकडून केलेल्या अवास्तव मागण्या आणि नंतर होणारा छळ यांचा उल्लेख केला आहे. अनेकवेळा तक्रार करूनही तिला हे पत्र लिहिण्यास भाग पाडले जात असल्याचे तिचे म्हणणे आहे.










