
रेड्डी यांनी विझियानगरम जिल्ह्यातील कांतकप्पल्ली येथे झालेल्या रेल्वे अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली.
आंध्र प्रदेशातील विझियानगरम जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी दोन गाड्यांमध्ये झालेल्या धडकेत (Andra Pradesh Train Accident) मृतांची संख्या १३ झाली आहे. तर 50 जण जखमी झाले आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. रविवारी संध्याकाळी विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर (ट्रेन क्रमांक ०८५३२) आणि विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर (ट्रेन क्रमांक ०८५०४) एकमेकांवर आदळली. या घटनेत तीन डब्यांचे नुकसान झाले आहे.
हे सुद्धा वाचा
विजियानगरमचे एसपी दीपिका यांनी सांगितले की, आंध्र प्रदेश रेल्वे अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी ७ जणांची ओळख पटली आहे, उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे.










