
निवडणूक आयोगातील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांनी माध्यमांना सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात सुरु असलेला आजचा युक्तिवाद संपला असून निवडणूक आयोगाने निर्णय राखीव ठेवला आहे. अजित पवार गटाकडून सांगण्यात आले की, संघटनेच मत विचारात घेऊ नका. याचा अर्थ आहे की, त्यांच्याकडे संघटना नाही. आमची मते लेखी स्वरूपात देण्यासाठी आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे. पक्षाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाच्या हाती आहे.




