
आज आयोजित केलेल्या जाहीर सभेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे.या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी शरद पवार,सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवार म्हणाले की, भावनिक होऊन प्रश्न सुटत नाहीत. विकासाचं ध्येय ठेवून पुढे जायचं आहे. विधानसभेला महायुतीला निवडून द्यायचे आहे. निवडणूक काळात हवसे, नवसे,गवसे येतील पण हा अजितदादा शब्द देणारा आहे.