
राज्य सरकारने राष्ट्रीय वन्यजीव मंडळाला असेही कळवले की, राजुरा स्थळांव्यतिरिक्त, राज्याने तीन पर्यायी स्थळांचा विचार केला होता. परंतु या ठिकाणी असलेल्या अति उच्च उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या, कारखान्यांची धुराडी आणि टेकड्यांसारख्या अडथळे असल्याने या ठिकाणी विमानतळ करण्यायोग्य वातावरण नव्हते. प्रस्तावित जागा आधीच अस्तित्वात असलेल्या मोरवा विमानतळापासून ३९ किमी अंतरावर आहे.



