
दरम्यान, आदिल खानने असा खुलासा केला की, राखी सावंतसोबतच या संपूर्ण प्रकरणामध्ये इतरही अनेक लोक सामील आहेत. मात्र, पापाराझींनी आदिल खानला ‘तो राखी सावंतला पुन्हा भेटणार का?’ विचारताच त्याने काहीही उत्तर दिले नाही. पहिल्या लग्नाप्रमाणेच राखी सावंतने आदिल खानसोबत गुपचूप दुसरे लग्न केले. मात्र, काही महिन्यांतच आदिल खानला तुरुंगात टाकल्यानंतर राखी सावंतने तिची बाजू साऱ्या जगासमोर मांडली.






