माण तालुक्याचे सुपुत्र फ्युचर फर्स्ट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभय धोंडीराम वाघमारे यांचा आज वाढदिवस निमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला

0
2
माण तालुक्याचे सुपुत्र फ्युचर फर्स्ट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभय धोंडीराम वाघमारे यांचा आज वाढदिवस निमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला

दहिवडी :30 ऑगस्ट आज माण तालुक्याचे सुपुत्र फ्युचर फर्स्ट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभय धोंडीराम वाघमारे यांचा आज वाढदिवस निमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा.. कोणत्याही व्यक्तीला समाजकारणाचा व राजकारणाचा केवळ वारसा असून चालत नाही तर ते निरपेक्षपणे करण्याचे संस्कार वडीलधाऱ्या लोकांकडून होणे गरजेचे असते. आणि याबाबत अभयभैय्या वाघमारे हे अतिशय भाग्यवान आहेत असं म्हटलं तर ते निश्चितपणे गैर होणार नाही. त्यांना निव्वळ वारसा मिळाला असं नाही तर समाजकारण अतिशय निस्वार्थीपणे करता यावं याचं बाळकडू त्यांना त्यांचे वडील व माण – फलटण मतदारसंघाचे दिवंगत आमदार धोंडीरामजी वाघमारे यांच्याकडून अगदी लहानपणापासूनच मिळालं.

अभय भैय्या यांचा आजवरचा जीवन प्रवास हा अतिशय संघर्षमय व आव्हानात्मक असा राहिला आहे. लहानपणापासूनच त्यांचा विशेष कल हा खेळाकडे होता. वयाच्या १४ व्या वर्षी संकरॉक ते गेट वे ऑफ इंडिया हा ५ किमीचा सागरी मार्ग पोहून त्यांनी आपल्यातील खेळाप्रती असलेली आस्था व कोणतेही आव्हान पेलण्याची क्षमता सिद्ध केली होती. त्याचे कौतुक म्हणून तत्कालीन महसूलमंत्री श्री. नारायण राणे साहेब यांच्यातर्फे अभय भैय्या यांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला होता. पुढे पद्मश्री डि. वाय. पाटील क्रीडा अकॅडमीतर्फे मुंबई, मुंबईच्या बाहेर व भारताबाहेर सुद्धा कॉर्पोरेट आणि क्लब लेव्हल असे अनेक वर्षे त्यांच्या ए डिव्हीजनकडून व्यावसायिक क्रिकेट खेळले. त्यासोबतच फिटनेस क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर याच संघाचे त्यांनी हेड फिटनेस कोच म्हणूनसुद्धा उत्तम काम केले होते. त्यासोबतच आयपीएल व रणजी संघातील खेळाडूंना फिटनेस संदर्भात मार्गदर्शन केले.

हे सर्व करत असतानाच त्यांनी फिटनेस ट्रेनिंगचे व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन २०१४ साली फ्युचर फर्स्ट अकॅडमी ही मुख्यतः लहान मुलांच्या फिटनेस व आरोग्यासाठी जनजागृती करून त्याद्वारे त्यांचे आरोग्य सुधारणा करण्यासाठी वाहिलेली पहिली अकॅडमी सुरू केली. त्यातही अनेक वर्षे काम केल्याने काही पालक आपल्या ऑटिस्टिक मुलांच्या समस्या घेऊन त्यांच्याकडे आले. अश्या ऑटीझम असलेल्या विशेष मुलांसाठी मानसिक व शारीरिक सुदृढतेसाठी कार्यरत एकही संस्था नसल्याने त्यांनी त्यांच्या या दिव्यांग मुलांच्या भवितव्यासाठी अकॅडमीतर्फे त्या मुलांचे प्रशिक्षण घेण्याचे सुरू केले. आज अनेक दिव्यांग मुले ज्यांना त्यापूर्वी काही बोलता येत नव्हतं की धड चालता येत नव्हतं ती मुले आज त्यांच्या या प्रशिक्षणामुळे व त्यांच्यावर आपल्या मुलांप्रमाणे घेतलेल्या मेहनतीमुळे या मुलांनी आपला आत्मविश्वास पुन्हा मिळवला आहे.

२०१८ साली अभय भैय्यांनी स्थापन केलेल्या फ्युचर फर्स्ट फाऊंडेशन या समाजसेवी संस्थेतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले गेले. विशेषतः कोरोनाच्या महाभयंकर कालखंडात रोज ४०० लोकांना साडेतीन महिने अन्न खाऊ घातले. त्याचा लाभ जवळपास २०,०० लोकांना झाला. अनेकांनी यास अन्नदान असे नाव दिले मात्र अभय भैय्या यांनी त्यास आपले कर्तव्य मानले.

त्याच काळात आरोग्य क्षेत्रात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना १२०० N-९५ मास्कचे वाटप केले तसेच कोविड काळात अतुल्य कार्य पार पाडणाऱ्या ३०० परिचारिका ज्यांना एखाद्या पाठच्या भावाप्रमाणे आपली आई आणि बहिणी ज्या दर्जाच्या साड्या घालतात अगदी त्याच दर्जाचे साडीवाटप व प्रशस्तीपत्र देवून अनोखी भाऊबीज साजरी केली. स्वच्छता कामगारांना पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी रेनकोटचे वाटप करून त्यांना कोणत्याही आजाराचा प्रादुर्भाव उद्भवू नये व त्यांच्यी प्रतिकारशक्ती अबाधित राहावी म्हणून अनेकदा फ्रूट बास्केट देवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली. कोरोना काळात रक्ताचा प्रचंड तुटवडा भासत होता त्यावेळेस महनगपलिकेच्या संयुक्त विद्यमाने फ्युचर फर्स्ट फाऊंडेशन तर्फे सर्व नियमांचे पालन करून रक्तदान शिबिर आयोजित करून अनेक रुग्णांना त्याचा लाभ करून देण्यात आला.

शाळा कॉलेजेस बंद असल्याने व बाहेर जाण्यास मनाई असल्याने अनेक लहान मुले मानसिक तणावाखाली वावरत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आलेलं होते. त्या मुलांमधील तणाव कमी व्हावा व त्यांच्यातील प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी महानगरपालिकेच्या परवानगीने आरोग्य शिबिराचे उत्तम आयोजन व व्यवस्थापन करण्यात आले होते.

संपूर्ण देश आपल्या घरादारात बंदिस्त असताना याकाळात मुक्या भटक्या कुत्र्यांना अन्न मिळणे अगदी दुरापास्त झाले होते. अश्यावेळी अभय भैय्या यांनी आपल्या काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन अश्या निष्पाप मुक्या जीवांना बिस्किट्स व डॉगफूड खायला घालून भुतदयेचा अनोखा आदर्श घालून दिला.

हा सगळा व्याप सांभाळत असतानाच आपण ज्या मातीतून जन्माला आलोय ती आपली मायभूमी आपल्याला साद घालतेय याची त्यांना सतत जाणीव होत होती. ज्या भागातील जनतेने आपल्या वडिलांना एकदा नव्हे तर दोनदा विधानसभेवर प्रचंड बहुमताने पाठविले होते त्या मायबाप जनतेचे उतराई होण्यासाठी त्यांनी आपले नवी मुंबईतील कार्य आपल्या सहकाऱ्यांवर सोपवून ते आज नव्या जोमाने आपल्या ग्रामीण भागात काम करण्यास सरसावले आहेत. आपल्या वडिलांचे यथोचित स्मारक त्यांच्या मूळगावी स्थापन करून त्याचे अनावरण पितृतुल्य असणारे देशाचे माजी संरक्षणमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले व याबद्दल आदरणीय पवार साहेबांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

माण तालुका असो खटाव तालुका असो किंवा त्यांच्यावर विशेष प्रेम करणाऱ्या फलटण भागातील सर्वसामान्य जनता असो अभय भैय्या या गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात अतिशय प्रामाणिकपणे सहभागी होताना दिसत आहेत.

आज अभय भैय्या यांचा वाढदिवस आहे. अनेक आमदार खासदारांची मुले अश्या प्रसंगी हारतुरे वा शुभेच्छा स्वीकारताना किंवा पार्टी झोडताना दिसतात परंतु आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून हा अस्सल माणदेशी माणूस साखरवाडी, फलटण येथील संत गाडगे महाराज मिशन या संस्थेतील निराधार मुलांसोबत एकत्र सहभोजन करून आपला हा आजचा दिवस आपल्या मायभुमीचे पांग फेडण्याचा निस्वार्थीपणे प्रयत्न करताना दिसत आहे.

अभय भैय्या तुमच्या आजच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या हातून माण फलटण ची सेवा अशीच अखंडपणे होवो व समाजकारण आणि राजकारणाच्या क्षितिजावर आपले भवितव्य उजळून निघो