
महाराष्ट्रातील नाट्य रसिकांना रंगभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर आधारित नाटक पाहायला मिळतात. मग काही कॉमेडी असो, क्राइमवर आधारित असोत किंवा मग बालनाटक असो प्रेक्षक आवार्जुन पाहाताना दिसतात. काही दिवसांपूर्वी एआयचा वापर करुन ‘आजीबाई जोरात’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले. या नाटकाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला. आता या नाटकाचा सुवर्ण महोत्सव साजरा होणार आहे. केवळ तीन महिन्यात ५० प्रयोग झालेल्या या नाटकाने प्रेक्षक, समीक्षक आणि मान्यवर अशा सगळ्यांचीच मने जिंकली आहेत.