
अनिरुद्ध म्हणाला की, “माझा राग, माझी चिडचिड तुम्हा सगळ्यांना दिसते. पण माझी माया दिसत नाही किंवा ती दाखवता येत नाही. आणि त्यामुळेच माझी जवळची, प्रेमाची माणसं माझ्यापासून दूरावली आहेत. पण माझ्या बहिणीच्या बाबतीत असे होऊ नसे असे मला सतत वाटते. म्हणून मी तुला (केदारला) माफ करतो. माझ्या बहिणीच्या आनंदासाठी मी काहीही करु शकतो. संजना तू म्हणतेस ना दर वेळेला माझा इगो आड येतो तर ते तसं नाहीये. माझ्यासाठी माझे हे कुटुंब महत्त्वाचे आहे.”







