
दुसरीकडे अरुंधती आणि आशुतोष हे मुल दत्तक घेण्याच्या विचार मनात ठेवून आश्रमात तिला भेटण्यासाठी गेले आहेत. अरुंधतीला तेथे पोहोचेपर्यंत काय करावे आणि काय करु नये हे कळत नाही. आशुतोष तिला समजावतो आणि हे सगळे विचार डोक्यातून काढून टाक असे म्हणतो. तेवढ्यात आश्रमातील एक बाई त्यांना त्या मुलीबद्दल सांगते. त्या मुलीला एका कुटुंबाची, एका आईच्या स्पर्शाची गरज असल्याचे सांगते. त्या मुलीचे नाव मनस्वी असे आहे. आता अरुंधती काय निर्णय घेणार? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. मालिकेच्या आगामी भागात त्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.








